नमो शेतकरी सन्मान योजनेची घोषणा राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. ३० मे रोजी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीचा निर्णय आता घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत ही माहिती दिली. योजनेंतर्गत तब्बल १ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत. यासह इतरही काही योजनांना मान्यता देण्यात आली आहे.