Indrajeet Sawant: ‘आगामी निवडणुकांमुळे ३५०वा शिवराज्याभिषेक असं ब्रॅण्डिंग’; इंद्रजीत सावंतांचा आरोप
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा येत्या ६ जूनला रायगडवर रंगणार आहे. यासाठी शिवभक्त आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीकडून मोठे नियोजन केले जात आहे. यंदाचा हा ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा असल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर ‘केवळ पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकांसह अनेक निवडणुका असल्याने ३५०वा शिवराज्याभिषेक सोहळा व्यवस्थित पार पडता येणार नाही या भीतीपोटी सरकार यंदा ३४९व्या शिवराज्याभिषेकला ३५०वा असं ब्रॅण्डिंग करत एक वर्ष आधीच साजरा करत आहे’ असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.