ओडिशातील रेल्वे अपघाताप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यावर खासदार संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सीबीआय चौकशी केवळ वेळकाढूपणा असल्याचं ते म्हणाले. तसंच नैतिकता म्हणून पंतप्रधान मोदी राजीनामा देणार का?, असा प्रश्नही त्यांनी केला. मुंबई ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.