J&K Attack| Pahalgam| पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि महाराष्ट्रासह देशभरातले २६ पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश होता. या भीषण हल्ल्यानंतर काश्मिरी पर्यटनावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच ज्यांनी पर्यटकांना हल्ल्याच्या वेळी मदतीचा हात दिला त्या काश्मिरी रहिवाशांनी भावुक होत आपली बाजू मांडली आहे.