Kalyan Women Dies At Hospital Door Due to Lack of Help, Delay In Ambulance: कल्याण डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात अत्यवस्थ असलेल्या सविता गोविंद बिराजदार (४३) या महिलेला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्यासाठी पाच तास रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या महिलेचा रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रवेशद्वारावर सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. पालिका रुग्णालय प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.