पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. दरम्यान भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईवर सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर भारतीय लष्कराचे कौतुकही होत आहे. अशातच आता भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज सोशल मीडियावर केलेल्या एका सूचक पोस्टची सध्या चर्चा आहे.