Uddhav Thackeray हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही अध्यादेश सरकारने रद्द केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जय महाराष्ट्रचा नारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बुलंद झाला असं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा म्हटलं आहे. तसंच भाजपावर जोरदार टीकाही केली आहे.