Raj Thackeray Remark on Mira Road incident at Victory Rally : मराठी जनतेचा रोष पाहून देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी भाषा सक्तीचा व त्रिभाषा सूत्रासंबंधीचा शासन निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व शिवसेनेने (ठाकरे) आज विजयोत्सव साजरा केला. मुंबईतील वरळी येथे दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेतला. दोन्ही पक्षांचे प्रमुख राज व उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला संबोधित केलं. दरम्यान, मीरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा करत शहरातील अमराठी व्यापाऱ्यांनी नुकताच बंद पुकारला होता. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून प्रतिक्रिया दिली.