‘जे काम केले, ते युतीचे श्रेय आहे. युतीमध्ये आम्हीही आहोत. पण, प्रत्येक वेळेला शिवसेनेला डावलायचे आणि परस्परच विकासाचे श्रेय घ्यायचे, या संस्कृतीमुळे पुणेकरांचे नुकसान झाले,’ अशी टीका शिवसेना (शिंदे) पक्षाच्या प्रवक्त्या, उपनेत्या डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ मध्ये बोलताना केली. दरम्यान त्यांनी महानगरपालिका निवडणुका आणि महायुतीतील सध्याची परिस्थिती यावरही भाष्य केलं














