विधानसभेत सोमवारी धर्म स्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विधेकामध्ये नमुद असेलेल्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांमध्ये धर्मांतरांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आहे. असं असताना धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली असेल तर हे अपयश कोणाचं आहे? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.














