Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. ‘गुरुदेवजींच्या चमत्कारामुळे माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली’, असं रितू तावडे यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अखेर आज महापौर रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.













