Avinash Jadhav: ठाणे महानगरपालिकेने सुमारे आठ-नऊ महिन्यांपूर्वी विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती. या भरती प्रक्रियेसाठी लाखो तरुणांनी अर्ज केले आणि प्रत्येकाकडून सुमारे १००० रुपये प्रमाणे शुल्कही घेण्यात आले. मात्र, आज इतका कालावधी उलटूनही या भरती प्रक्रियेबाबत कोणतीही ठोस माहिती, परीक्षा किंवा पुढील टप्प्यांविषयी कोणताही प्रतिसाद उमेदवारांना देण्यात आलेला नाही, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली. अशातच आता ठाणे महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन करुन, असा इशारा अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.










