नरसरापूरमध्ये घडेलल्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या प्रकरणी अभिनेता रितेश देशमुख यानेही प्रतिक्रिया देत महाराजांच्या चौरंग करण्याच्या शिक्षेची आठवण येते, असं म्हटलं. तर सरकारने, पोलिसांनी आणि कोर्टाने यावर कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही रितेश देशमुख म्हणाला. देशभरात प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजी चित्रपटाच्या
यशानंतर रितेश देशमुख आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आला होता.












