पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २०७ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भाजपाची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार हे स्पष्ट झालं आहे. मात्र तृणमूल काँग्रेसच्या मुख्य नेत्या ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. निवडणूक निकाल हे निवडणूक आयोगाने भाजपाच्या साथीने रचलेलं षडयंत्र आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. अशी राजकीय परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा संविधानातील तरतूद काय सांगते हे आपण जाणून घेणार आहोत.














