Amol Mitkari: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. दरम्यान अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघात झाला की घडवून आणला गेला? त्यामागे घातपात होता का? असे प्रश्न उपस्थित झाले. अमोल मिटकरी यांनीही आता अजित पवारांच्या अपघाताच्या आधी अघोरी पूजा झाली होती, असा दावा केला आहे.











