Dattatray Bharne: शेतकऱ्यांची कर्जमाफी नेमकी कधी होणार? यावरून विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज (३१ मे) शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची थेट तारीख सांगितली आहे












