विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील तबब्ल ८० लाख बहिणी आता अपात्र ठरल्या आहेत.ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर किती महिला पात्र व अपात्र ठरल्या यासंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार या योजनेत १ कोटी ६६ लाख बहिणी अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत. तर निकषांची पूर्तता न झालेल्या ८० लाख महिला या अपात्र ठरल्या आहेत.











