महायुतीमध्ये नाशिकमधील ही जागा शिवसेनेला सुटल्यानंतर दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे या दोघांसोबत चर्चा झाली आहे. तर गणेश गीते यांच्यासोबतही सविस्तर चर्चा झाली. दोन्ही उमेदवारांनी त्यांची भूमिका आमच्यासमोर मांडली आहे. त्यांनी विचार करण्यासाठी आणि कुटुंबीयांशी चर्चा करण्यासाठी आज रात्रीपर्यंतचा वेळ मागितला आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर चर्चा सकारात्मक वातावरणात झाली असून कोणतीही नकारात्मकता नाही, असंही उदय सामंत म्हणाले.









