पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत केंद्र सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.











