राज्यात मागील काही दिवस मान्सूनने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही भागात जरी वादळी पावसाची आणि हलक्या सरींची नोंद होत असली तरी बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात दाखल झालेला मान्सून केव्हा सक्रिय होतो? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तर काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आजही राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.













