Maharashtra Weather Update: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली असून त्यामुळे अनेक भागात उकाड्यात काहीशी वाढ झाली आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असली तरीही राज्यात सर्वदूर पावसासाठी पोषक हवामान स्थितीची गरज आहे. दरम्यान, राज्यातील काही प्रदेशात गुरुवारपासून वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच राज्यातील कमाल तापमानात पुढील तीन – चार दिवस फारसा बदल होणार नाही, अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.











