विक्रोळी (पश्चिम) येथील राहुल नगरमध्ये ६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून थेट चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (४०) आणि त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.













