विमानतळावर नोकरी देण्याचं आमिष दाखवत एका खाजगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. शासकीय भरतीप्रमाणेच पारदर्शक प्रक्रिया असल्याचा दावा करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून ५०० ते ७०० रुपयांची फी उकळण्यात आली. महिन्याला २५ हजार रुपयांचा पगार आणि विमानतळावरील नोकरीच्या आमिषाला बळी पडत राज्यभरातील शेकडो विद्यार्थी रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा येथील एका शाळेत पोहोचले. पण आपली फसवणूक झाल्याचा दावा आता या विद्यार्थ्यांनी केला आहे.












