लोकसभा हे देशातील सर्वोच्च लोकप्रतिनिधीगृह असून तेथे विरोधी पक्षनेता हवाच, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सी.पी.जोशी यांनी याबाबत एक अहवाल तयार केला असून विरोधी पक्षनेत्याची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यामध्ये विषद करण्यात आले आहे. सरकारची आणि विरोधकांची निवड जनता एकाच वेळी करते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे जोशी म्हणाले.