पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यात धर्मनिरपेक्ष शक्तींची खिल्ली उडविल्याने काँग्रेसने संताप व्यक्त करीत मोदींवर जोरदार टीका केली आहे. परकीय भूमीत जाऊन अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा प्रकार धक्कादायक आणि अशोभनीय असून त्यामुळे जपानमध्ये भारताचे हसे झाले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
भारतात मोदी यांचा पक्षच जातीय तणाव वाढवीत असताना परकीय भूमीवर जाऊन धर्मनिरपेक्ष शक्तींवर टीका करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांनी ट्विट केले आहे. धर्मनिरपेक्षतेवर केलेली टीका अशोभनीय, अस्वीकारार्ह आणि अनपेक्षित आहे, असे झा म्हणाले.