काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडीवरून धुसफूस सुरु असली तरी जागावाटपाची प्रक्रिया १० सप्टेबर पर्यंत पूर्ण करावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत काही निवडक नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आघाडी आणि पक्षाची एकूणच भूमिका यावर चर्चा करण्यात आली. जागावाटप संदर्भातील चर्चेची पुढील फेरी कॉग्रेसबरोबर पुढच्या आठवडय़ात नवी दिल्लीत सुरु करण्यात येणार आहे. एकूणच दोन्ही पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीच्या चर्चेला मुद्दामच विलंब केल्याची चर्चा आहे.