नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तेलंगण राज्याविषयी एकही उलटसुलट शब्द काढल्यास अथवा नव्या राज्याचा यापुढे अवमान केल्यास अशा दूरचित्रवाहिन्यांना १० फूट खोल गाडून टाकू, असे वक्तव्य तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. तेलंगण राज्याचा अवमान करणारी वक्तव्ये करणाऱ्यांचे अस्तित्व आणि त्यांची प्रतिष्ठा गाडली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.