दिल्लीश्वरांच्या आज्ञेपुढे शेपूट हलवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको अशा शेलक्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसवर टीका केली. ते दापोलीत सेनेचे उमेदवार सुर्यकांत दळवी यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
दिल्लीत काँग्रेसचे सरकार आणि राज्यातही आघाडी सरकार असूनसुद्धा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भल्यापेक्षा दिल्लीश्वरांच्या आज्ञेलाच अधिक महत्त्व दिले. असा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. मुख्यमंत्री कोण होणर हे दिल्ली न ठरवता, महाराष्ट्रातील जनता ठरवणार, असेही उध्दव यावेळी म्हणाले.
भाजपला सत्ता दिल्यास छत्रपती शिवाजी महाराजही डोक्यावर हात मारून ‘अरे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा’ असे म्हणतील, अशी भाजपच्या जाहिरातीची खिल्लीही उध्दव यांनी यावेळी उडवली.