केरळमधील राजकीय हिंसाचाराला राज्य सरकारने त्वरित पायबंद घातला पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.  संघ परिवारातील कार्यकर्ता के. मनोज याची माकपच्या कार्यकर्त्यांनी हत्या केली, त्याच्या परिवारातील सदस्यांची भेट घेण्यासाठी राजनाथ सिंग कन्नूरमध्ये आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढल्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार कोसळणार हे नक्की झाल्यावर मंत्र्यांनी आपापला बाडबिस्तरा बांधायला सुरुवात केली. ‘हवे’ ते बरोबर घेतल्यावर ‘नको’ त्याची ही अशीच गत होते. वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कार्यालयातील हे बोलके चित्र. छाया : संजय बापट