प्रसार माध्यमांमधून दाखवण्यात येत असेलेल्या निवडणूक जनमत चाचण्या खोट्या असून, शिवसेना जनमत चाचण्याकरत बसत नसून लोकांची कामे करण्यासाठी बांधील आहे. लोकसभेच्या प्रचारावेळी हे ठाण्याचे मैदान पुर्ण भरले नव्हते असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला काढला. उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. युती तुटण्याचे खापर उध्दव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर फोडले.