ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, विचारवंत भालचंद्र नेमाडे यांच्या पंचाहत्तरीनिमित्ताने ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांनी उलगडून दाखविलेले आगळेवेगळे नेमाडे..  लोकसत्ता लोकरंगमध्ये (२६ मे २०१३) प्रसिद्ध झालेल्या या लेखाचा संपादित अंश ज्ञानपीठच्या आनंद सोहळ्यानिमित्ताने आज पुन्हा प्रकाशित करीत आहोत.
आता तुम्ही म्हणाल की ज्ञानपीठ म्हणजे काय, तर हा एक साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार असून तो उदाहरणार्थ थोर थोर साहित्यिकांना देण्यात येतो. आता हे थोर साहित्यिक म्हणजे कोण, तर भालचंद्र नेमाडेंना मराठीतील थोर साहित्यिक म्हटले जाई कारण त्यांनी अनेक थोर थोर कादंबऱ्या लिहिल्या व पुन्हा साहित्याची समीक्षाही केली व देशीवादसुद्धा मांडला. तेव्हा हे गृहस्थ खरोखर थोरच होते हे तर त्यांच्या सुहृदांनी जागविलेल्या समृद्ध वगैरे स्मृतींतूनही दिसते. आता तुम्ही म्हणाल की या स्मृती म्हणजे काय, तर त्या येथेच देत आहोत..

नेमाडय़ांना ज्ञानपीठ मिळाल्याचे शुक्रवारी दुपारी कळले आणि सर्वप्रथम मी पदमदेव कौशल याला आणि नंतर प्राध्यापक चेतन सिंग यांना फोन केला. चेतन हा शिमल्याच्या प्रसिद्ध इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज या संस्थेचा संचालक, तर पदमदेव हा तिथला कंत्राटी ड्रायव्हर. दरवर्षी इन्स्टिटय़ूटमध्ये   vv07येणाऱ्या वेगवेगळ्या फेलोजच्या संपर्कामुळे बहुश्रुत झालेला. नेमाडय़ांचा पक्का अ‍ॅडमायरर. नेमाडय़ांची बातमी ऐकून त्याला झालेला आनंद मला कळत होता. ‘नेमाडेसाब की’ बातमी त्याने एव्हाना राकेशला आणि बालुगंजमधील नेमाडय़ांच्या इतर मित्रांनाही कळवली असणार. राकेश हा नेमाडय़ांना मेसमधून रात्रीचा डबा घरी नेऊन देणारा. त्याला कितीही उशीर झाला तरी नेमाडे त्याला कधीच काही बोलणार नाहीत आणि आज चार वर्षांनंतरही राकेश आणि त्याचे मित्र याचीच आठवण ठेवणार आणि चार वर्षांनंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये नेमाडे शिमल्याला आलेले असताना सगळे एकसाथ नेमाडय़ांचे ‘पाय लागू’ करणार. पदम आणि राकेशसारखाच बालुगंजमधील नेमाडय़ांच्या मित्रांनाही असाच आनंद झाला असणार. बालुगंज म्हणजे इन्स्टिटय़ूटला सगळ्यात जवळचा ‘बाजार’. जेमतेम वीस ते पंचवीस दुकानांचा पण आम्हा इन्स्टिटय़ूटवासीयांच्या अत्यंत बेसिक गरजा भागविणारा. इन्स्टिटय़ूटच्या फेलोजना रोज एकदा तरी तिथे जावे लागणारा. साहजिकच दोन वर्षांच्या वास्तव्यात सगळ्याच दुकानदारांची निदान तोंडओळख, तर काहींची चांगली मत्रीही होत असते. ‘नेमाडेसाब के’ असे खूप मित्र या बालुगंजमध्ये आहेत. मी पुण्याचा म्हटल्यावर त्यांनी नेमाडय़ांची अत्यंत प्रेमाने आणि त्यांच्या प्रसिद्ध मिशीची आठवण काढीत माझ्याकडे अनेकदा चौकशी केली आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये नेमाडे vv08शिमल्याला आले असताना मुद्दाम वेळ काढून ते बालुगंजमधील त्यांच्या सर्व मित्रांना म्हणजे भाजीवाले, किराणावाले, सलूनवाले, समोसा-जलेबी हॉटेलवाले यांना भेटून आले. सामान्यातील सामान्य माणसाशी सतत संवाद हे त्यांच्या देशीवादाचे एक महत्त्वाचे ऊर्जास्थान आहे असे मला वाटते. शिमल्याच्या मुक्कामात आम्ही तारादेवी व जाखू या दोन प्रसिद्ध ठिकाणी गेलो असता तेथील लोकांशी बोलून या ठिकाणाबद्दलच्या स्थानिक लोककथा कोणत्या आहेत याची त्यांनी सखोल चौकशी केली होती. त्यातूनच जाखू म्हणजे यक्ष या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे व तिथले हनुमानाचे प्राचीन मंदिर सर्वोच्च उंचीवर का आहे आणि त्या संपूर्ण परिसरात वानरांची गर्दी का असते याबद्दलची स्थानिक कथाही समजली. जाखूचे मंदिर एक टूरिस्ट स्पॉट म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथे मंदिर म्हणून जायचे की टूरिस्ट स्पॉट म्हणून जायचे हा घोळ न घालता केलेल्या प्रवासात नेमाडे आस्तिक की नास्तिक हे मला कळण्याचा काहीच मार्ग नव्हता व अजूनही ते कळलेले नाही. पण जे कळले ते हे, की त्यांना आपल्या आजूबाजूच्या जगात प्रचलित असलेल्या कथा, लोककथा, दंतकथा, इतिहासाच्या विविध vv10खाणाखुणा यांमध्ये प्रचंड रस आहे. शिमल्यापासून फार दूर नसलेल्या तारादेवीच्या मंदिरातल्या भंडाऱ्याची प्रथा कशी आणि केव्हा सुरू झाली, तारादेवीची लोककथा काय आहे, मंदिरातल्या िभतींवर कोरलेल्या देणगीदारांच्या जाती कोणत्या, ते कोणती भाषा बोलतात, त्यांच्या चालीरीती कोणत्या, हे सर्व तपशील एखाद्या मानववंश शास्त्रज्ञाच्या सफाईने ते मंदिराच्या पुजाऱ्यापासून ते तिथे लग्न लावण्यासाठी आलेल्या आसपासच्या खेडय़ातल्या लोकांना विचारत होते. या त्यांच्या वृत्तीचेच प्रतिबिंब िहदूतल्या खंडेरावात उमटले आहे. हा खंडेराव िहदूतून प्रकट होण्याधीच मला शिमल्याला भेटला होता. २००८-२०१० ही दोन वष्रे नेमाडय़ांनी शिमल्याच्या प्रसिद्ध इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेत नॅशनल फेलो म्हणून काढली. याच वास्तव्यात त्यांनी िहदूचे बहुतांश लेखन पूर्ण केले आहे. जवळपास एक वर्ष नेमाडय़ांना इन्स्टिटय़ूटचे क्वार्टर मिळाले नसल्याने ते गेस्ट हाउसमध्येच नेमाडे वहिनींसह राहाvv09त असत. मेसमध्ये दुपारी एकत्र जेवताना बऱ्याचदा नेमाडे पती-पत्नी, मी व सौ. देशपांडे एकत्र असायचो. तेव्हा नेमाडय़ांच्या स्वभावातील अस्सल मिस्कीलपणा व एक देशी रांगडेपणा अनुभवायला मिळायचा. त्याचाच प्रत्यय चर्चासत्रासारख्या अत्यंत फॉर्मल वातावरणातही नेमाडे न चुकता देत. इन्स्टिटय़ूटमधील चर्चासत्रातल्या नेमाडय़ांच्या देशी गुगल्या या विषयावर एखाद्याला पीएचडी सहज मिळू शकेल असे आता मला वाटू लागले आहे. इन्स्टिटय़ूटमध्ये दररोजच कुठले न कुठले तरी चर्चासत्र झडत असे. त्यामुळे दिवसाचा बराच वेळ त्यात जाई. मग नेमाडे महाशय पूर्ण रात्र जागून प्रकाशकाकडून आलेली िहदूची प्रूफे तपासून देणे व पुढील लिखाण करणे ही कामे करीत. नेमाडे शिमल्यातल्या नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाल्यानंतर राकेशने नेऊन दिलेला रात्रीचा जेवणाचा डबा एकदा बाहेरच राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमाडय़ांच्या फ्लॅटचे दारही बऱ्याच उशिरापर्यंत बंदच आढळले. आतून काही रिस्पॉन्सही मिळेना. हे अर्थातच नेमाडे वहिनी मुंबईस गेल्यामुळे झाले होते. पण त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उडालेल्या गोंधळाचे किस्से तिकडे अजूनही सांगितले जातात. पण अशा अधूनमधून उडणाऱ्या गोंधळापलीकडचे नेमाडे हे एक सहृदय आणि तितकेच रसिक व्यक्तिमत्त्व आहे.      
नेमाडय़ांच्या सहवासात ‘कोसला’चा विषय निघणार नाही असं क्वचितच घडलं. कॉलेजात असताना नेमाडय़ांची ‘कोसला’ वाचली नाही असं माझ्या मित्रपरिवारात कोणीच नव्हतं. धुळ्याच्या ज्या प्रसिद्ध महाविद्यालयात नेमाडे शिकवीत त्याचे चित्रण ‘कोसला’त आले आहे. त्यातील आमच्या खानदेशी वातावरणामुळे ते मला अधिकच जवळचे वाटायचे. त्यात काही विक्षिप्त प्राध्यापकांचे वर्णन नेमाडय़ांनी त्यांच्या खास शैलीत केले आहे. ते वाचताना मजा यायची. पुढे ७५-७६च्या दरम्यान पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यासृ-मंडळाच्या मीटिंगसाठी धुळ्याच्या त्या महाविद्यालयातले तर्कशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. (कै.) भालचंद्र केतकर आले असता ‘कोसला’चा विषय निघाला. तेव्हा त्यातील ‘तो विक्षिप्त प्राध्यापक म्हणजे मी’ अशी माहिती प्रा. केतकर यांनी दिली. विद्यार्थी असल्यास येथे तर्कशास्त्र शिकविले जाईल अशी पाटीच केतकरांनी कॉलेजातल्या आपल्या रूमबाहेर लावली होती. नेमाडय़ांशी प्रत्यक्ष परिचय होण्याआधी ‘कोसला’तल्या त्यांच्या एका काल्पनिक नसलेल्या पात्राशी माझा असा अकस्मात परिचय झाला होता. आश्चर्य म्हणजे विक्षिप्त म्हणून रंगविलेल्या केतकरांचे आणि नेमाडय़ांचे संबंध पुढील आयुष्यात मत्रीचेच राहिले होते! नेमाडय़ांच्या धुळ्यातल्या दिवसांचे काही धागे असे अचानक हाती लागले होते. नेमाडय़ांची प्रत्यक्ष ओळख नसताना नेमाडय़ांशी ओळख व्हावी असे वाटायचे. फर्गसनच्या दिवसातले त्यांचे हॉस्टेलमेट प्रा. शंकरराव तळघट्टी, मराठवाडा विद्यापीठातील त्यांचे सहकारी प्रा. उत्तमराव भोईटे हे माझे ज्येष्ठ सहकारी मित्र. त्यांच्याकडून क्वचित नेमाडय़ांचा विषय निघायचा. पण भेटीचा योग आला नव्हता. तो आला तेव्हा या संधीचा फायदा घेऊन ‘कोसला’ आणि ‘िहदू’बद्दल नेमाडय़ांना अधिक बोलते करण्याची संधी मी शोधत होतो. ती मला इन्स्टिटय़ूटमध्ये ‘ट्रान्सग्रेशन’ (उल्लंघन) या बहुआयामी कल्पनेवर आधारित परिसंवादाचे आयोजन करण्याच्या निमित्ताने मिळाली. ‘कोसला’तील पांडुरंग आणि िहदूतील खंडेराव हे नेमके कोण आहेत? त्यांचे प्रश्न काय आहेत? त्यांच्या प्रेरणा कोणत्या आहेत? ते कोणत्या सीमारेषेवर उभे आहेत? या अनुषंगाने नेमाडय़ांनी बोलावे असे ठरले व नेमाडय़ांनी ते मान्य केले. जोडीला अशोक बाजपाई, इन्स्टिटय़ूटमधले सध्याचे नॅशनल फेलो व िहदीतले प्रसिद्ध कवी राजेश जोशी आदी मंडळी होती. ‘कोसला’तला पांडुरंग आपल्या भोवतीचा परीघ ओलांडण्याचा प्रयत्न करतो, हे मी कादंबरी लेखनाच्या सुरक्षित परिघामध्ये लिहून गेलो. पण ‘िहदू’तला खंडेराव परंपरेच्या परिघाचे समर्थन करतो हे मी कादंबरी लेखनाचा सुरक्षित परीघ ओलांडल्यावरच लिहू शकलो, हा मुद्दा त्यांनी मांडला आणि तो मांडताना सीमा कशाला ओलांडायच्या, परंपरा कशाला मोडायच्या, जाती का सोडायच्या हे  प्रश्न विचारून एकच (वैचारिक) धमाल उडवून दिली..
..आणि घरी जेवताना गुजराती किंवा हिमाचली कढीऐवजी आपली मराठी कढीच बरी असे म्हणून देशीवादाचा पुरस्कारही करून गेले!
(लेखक पुणे विद्यापीठाचे तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. सध्या  शिमल्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीजमधील रवींद्रनाथ टागोर पीठासनाचे फेलो आहेत.)

 प्रा. शरद देशपांडे