शेखर जोशी – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून त्याचा संबंध जीवनशैलीशीदेखील निगडीत आहे. ऋतुचक्राशी निगडित असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत असणारा कालावधी ‘चातुर्मास’ म्हणून मानला जातो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदी धार्मिक कार्यासाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र समजला जातो. मराठी संस्कृतीमधील श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. चातुर्मास कालावधीत ठिकठिकाणी धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. काळानुरूप चातुर्मास पाळण्याचे संदर्भ बदलले असले तरी आजही प्रत्येक जण श्रद्धावान माणूस जमेल तसे चातुर्मासाचे पालन करतो. त्यामुळे बदलत्या काळातही चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व अबाधित आहे.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaturmas
First published on: 31-08-2018 at 01:03 IST