शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर मानवाचा आणि निसर्गाचा संबंध आणखीन दृढ होत गेला. चातुर्मासातील सारेच सण हे कृषी संस्कृतीशीच जोडले आहेत.  केवळ हिंदूच नाही तर बौद्ध व जैन धर्मातदेखील चातुर्मासाचा संबंध दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मानवाचा व निसर्गाचा संबंध निकटचा आहे. मानवाने स्वत:ला निसर्गापासून कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही. तो स्वत: या निसर्गाचाच एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणूनच भारतीय सणांमध्ये या निसर्गाला अनुसरून व्रतवैकल्ये व सणांचा समावेश झालेला दिसतो. या व्रतवैकल्ये आणि सणांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा काळ पार अश्मयुगापर्यंत मागे जाऊ शकतो. अश्मयुगीन मानव हा भटका होता. भूक व मथुन या त्याच्या दोन मूलभूत गरजा होत्या, उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर निसर्ग त्याची गरज भागवत होता. पाऊस, ऊन, थंडी अशी निसर्गाची विविध रूपे अनुभवत असताना मानवाला त्यामागील शास्त्रीय कारणे भटकंतीच्या त्या टप्प्यावर समजणे कठीणच होते. मग पाऊस का पडतो? विजा का चमकतात? असे प्रश्न त्याला पडू लागले. या प्रश्नांची उत्तरे आपल्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्याने केला. मानव हा बुद्धिमान असला तरी तो तितकाच संवेदनशील प्राणीही आहे. बुद्धीपलीकडचे जे घडते आहे ते असे का घडते? यामागे काही तरी चमत्कार असावा, असे समजून निसर्गात होणाऱ्या या नसíगक बदलांना मानवाने सुरुवातीच्या काळात देवत्व बहाल केले. याचीच काही उदाहरणे आपल्याला हडप्पासारख्या आदिम संस्कृतींमध्येही जल, सूर्य, मातृउपासनेसारख्या विधींमधून पाहावयास मिळतात. याच उपासनेची पुढे विकसित व प्रगत रूपे आपल्याला भारतीय संस्कृतीत आढळतात. जगात इतरत्र आढळणार नाही असे निसर्गाचे पराकोटीचे महत्त्व भारतीय व्रतवैकल्यांमध्ये आढळते, परंतु त्यामागच्या शास्त्रीय कारणांचा मात्र आपल्याला विसर पडला आहे. हे सण, ही व्रतवैकल्ये श्रद्धा की अंधश्रद्धा, या वादात अडकून पडली आहेत.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain religion and chaturmas
First published on: 31-08-2018 at 01:05 IST