अभिषेक तेली
Already have an account? Sign in
रंगभूमी म्हणजे कलाकारासाठी अविरतपणे सुरू असलेला कलेचा श्वास असतो. उराशी अनेक स्वप्नं बाळगून प्रत्येक कलाकार रंगभूमीची सेवा करतो, तिला स्वत:चे दुसरे घरच मानतो. खरंतर सर्वसामान्य व्यक्तीमधील कलेला रंगभूमीवर आकार मिळतो आणि मग एक ‘कलाकार’ म्हणून तो घडत जातो. याच रंगभूमीच्या गौरवार्थ दरवर्षी २७ मार्च हा दिवस ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. मुळात रंगभूमी म्हणून आज जे नाटय़गृह आणि तिथली व्यवस्था आपण पाहतो, त्याची सुरुवात उघडय़ावर मोकळय़ा जागी जन्माला आलेल्या नाटय़कलेनेच झाली. आज ही खुला रंगमंच संकल्पनाच जणू लोप पावत चालली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने खुले रंगमंच राज्यभरात कुठे आहेत आणि त्याचा तरुण रंगकर्मीना कसा फायदा होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..
आपल्या देशात विशेषत: महाराष्ट्रात काळानुरूप गावोगावी तसंच शहरांमध्ये बंदिस्त नाटय़गृहांची उभारणी केली गेली. त्यामुळे आता महाराष्ट्रात खुले रंगमंच राहिलेलेच नाहीत. एकीकडे राज्यातील बंदिस्त सभागृहांची अवस्था अत्यंत वाईट असून, कलाकारांना नाटय़प्रयोग करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आहे. कधी नाटय़प्रयोग सुरू असताना नाटय़गृहातील वातानुकूलित सुविधा बंद पडते, तर कधी प्रसाधनगृहांमध्ये मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता आढळते. नाटय़गृहांची वाढलेली भाडी यामुळे नवोदित कलाकार आणि निर्मात्यांनाही नाटकाचा एकूणच आर्थिक डोलारा पेलवत नाही. या पार्श्वभूमीवर खरंतर नाटय़निर्माते व प्रेक्षकांना आर्थिकदृष्टय़ा तर कलाकारांना विविध गोष्टी सांभाळत स्वत:मधील अभिनयकलेला आकार देण्यासाठी खुला रंगमंच हा अत्यंत उपयुक्त ठरतो. नाटय़निर्मितीचा मोठा अनुभव असलेले आणि दिग्गज नाटय़कलाकारांची कारकीर्द जवळून अनुभवलेले ज्येष्ठ नाटय़निर्माते आणि रंगकर्मी सुरेंद्र दातार सांगतात, ‘पूर्वी कोकणामध्ये नारळाच्या झाडाच्या झावळय़ांपासून उत्तम नाटय़गृहे तयार केली जायची, वातानुकूलित बंदिस्त सभागृहे यापुढे फिकी पडतील. आता कोकणातही बंदिस्त सभागृहे आहेत. पूर्वी नाशिकच्या पुढे संगमनेरला कवी अनंत फंदी यांच्या नावाने खुला रंगमंच होता, तिथे आम्ही ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग केला होता. पुण्यात जेव्हा बालगंधर्व रंगमंदिर नव्हते, तेव्हा न्यू इंग्लिश स्कूलमधील खुल्या रंगमंचावर नाटय़प्रयोग व्हायचे. एसपी कॉलेजच्या मैदानातील खुल्या रंगमंचावरही नाटय़प्रयोग झाले. राज्य नाटय़ स्पर्धेतून पुढे आलेले डॉ. श्रीराम लागू, प्रभाकर पणशीकर, श्रीकांत मोघे आदी रंगकर्मीनी अभिनयाचे धडे याच ठिकाणी गिरविले. डॉ. अमृत नारायण भालेराव यांनी सुरू केलेले गिरगावमधील मुंबई
खुल्या रंगमंचावरचा खुलेपणा हा आव्हानात्मक असल्यामुळे कलाकार हा अधिक वेगळेपणाने घडतो. यामुळे त्याला त्याचा आवाज, शरीर, विषयाची मांडणी आदी विविध कौशल्ये ही वेगळय़ा पद्धतीने वापरावी लागतात. या रंगमंचावर वेगळय़ा पद्धतीने सादरीकरण करणे, निरनिराळे विषय हाताळता येणे, विविध प्रायोगिक नाटके करता येणे शक्य असल्यामुळे नवोदित कलाकारांसाठी हा रंगमंच खूप महत्वाचा असतो. आर्थिक गणितेसुद्धा व्यवस्थित जुळवता येतात. खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून नाटकाद्वारे शिक्षण, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य अशा अतिशय महत्वाच्या विषयांबाबत समाजप्रबोधन करता येते. ज्या ठिकाणी हे खुले रंगमंच आहेत, त्या ठिकाणच्या समूहासाठी हे महत्त्वाचे असते, असे मत रंगकर्मी आनंद चाबुकस्वार यांनी व्यक्त केले.
विद्येचे माहेरघर पुणे
मित्राच्या नावाने खुला रंगमंच सुरू
आमचा मित्र अभिनेता राहुल शिरसाट याचे चार महिन्यांपूर्वी दुर्दैवाने निधन झाले. मग त्याच्याच नावाने आम्ही कल्याणमधील सोशल वेलफेअर स्कूलच्या संकुलात खुला रंगमंच सुरू केला. हा खुला रंगमंच संपूर्णत: प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून प्रकाशयोजना, िवगा आदी नाटय़गृहांसारख्या गोष्टी इथे नाही आहेत. जेव्हा आम्ही या ठिकाणी पहिल्यांदा अभिवाचनाचा प्रयोग केला, तेव्हा १०० ते १२५ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. जेव्हा आम्ही इथे दर महिन्याला अभिवाचनाचा अथवा कोणताही नाटय़प्रयोग करू, तेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे सोयीस्कर होईल. भलीमोठी नाटय़गृहे ही आर्थिकदृष्टय़ा निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना परवडत नसल्यामुळे, खुला रंगमंच हा उपयुक्त ठरतो. या रंगमंचावर प्रायोगिक नाटकांचे मोठय़ा संख्येने प्रयोग होतात, यामुळे कलाकारांची तालीम होत राहते आणि एकंदरीत कलाकार घडत जातो. आम्ही स्वेच्छामूल्याने नाटय़प्रयोग आयोजित करीत आहोत. खुल्या रंगमंचाच्या माध्यमातून कलाकार व प्रेक्षकांमधील दरी संपते. नाटक संपल्यानंतर त्यावर चर्चा होते, विचारांचे आदान-प्रदान होते. मोकळय़ा जागेत कलाकारालाही स्वत:च्या आवाजातील गंमत व स्तर कळतो, आजूबाजूचे सर्व अडथळे सांभाळून नाटक कसे खेळवावे हेसुद्धा कळते, असे अभिनेते-दिग्दर्शक अभिजीत झुंझारराव यांनी सांगितले.
प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आवाज पोहोचवण्याची कुवत निर्माण झाली
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात आल्यावर मी पहिल्यांदा अॅम्फी थिएटरवर काम केलं. तेव्हा मला जाणवलेला सर्वात मोठा फरक आणि फायदा असा की, रंगभूमीवर काम करणाऱ्या नटांना त्यांच्या आवाजाचा व शरीराचा सैलसर वापर करण्यासाठी तशा मोकळय़ाढाकळय़ा जागेची गरज असते. केंद्रातली मुलं नाटकाचे सादरीकरण करताना, या जागेत माइकचा आधार घेत नाहीत. एवढय़ा मोठय़ा आणि मोकळय़ा जागेतही प्रत्येक प्रेक्षकापर्यंत स्वत:चा आवाज पोहोचेल, एवढी कुवत मुलांच्या आवाजात या जागेने तयार केली. कमानी रंगमंच म्हणजे बंदिस्त नाटय़गृहात नाटकातल्या चुका झाकल्या जातात. तर खुल्या रंगमंचामध्ये ड्रॅमॅटिक स्पेस तयार करणे हे मोठे आव्हान असते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटय़ विभागातील तृतीय वर्षांची विद्यार्थिनी सिमरन खेडकरने व्यक्त केले.
viva@expressindia.com