कमी पावसामुळे जिल्ह्य़ात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ११७ गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली असून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त उपसा करण्यासही बंदी घालण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी ओम प्रकाश बकोरीया यांनी दिली.टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या ११७ गावांमध्ये शहादा तालुक्यातील २८ गावांचा समावेश असून त्यात चांदशैली, लंगडीभवानी, शहाणे, भोगरा, वडगाव, नवानगर, जावदे, तितरी, कलमाडी, भोरटेक, चिखली, डामळदे, ओझर्टे, जाम, काथर्दे, खेडदिगर, टूकी, अनरद, पुसनद, कहाटूळ, लोंढर्रे, वडछील, पिंपर्डे, कवठाड, लोहारा, कमरावद, सावखेडा, या गावांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातील २६ गावांमध्ये बालअमराई, भवानीपाडा, धानोरा आदी गावांचा समावेश आहे.अक्कलकुवा तालुक्यातील १० तर, अक्राणी तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे.