जिल्हय़ातील कयाधू नदीवर १४ बंधारे, तसेच ५ साठवण तलावांसाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या कामास मंजुरी मिळाल्याची माहिती माजी खासदार शिवाजी माने यांनी दिली.
जिल्हय़ातील सिंचन अनुशेषाच्या प्रश्नावर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीची माहिती माने यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीत दिली. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, अप्पर मुख्य सचिव बक्षी, प्रधान सचिव ए. बी. पाटील, मुख्य अभियंता लोखंडे, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम आदी या बैठकीस उपस्थित होते.