एमआयटी, औरंगाबाद प्रायोजित नवव्या राष्ट्रीय टच रग्बी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महिला गटाचे जेतेपद छत्तीसगड संघाने पटकावले. बिहार संघावर ३-१ अशी मात करीत छत्तीसगडचा संघ अजिंक्य ठरला. पुरुष गटात हरयाणाने छत्तीसगडचा ५-४ गुणांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात अनुक्रमे हिमाचल प्रदेश व कर्नाटक संघाने बाजी मारली. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा उत्कृष्ट खेळाडू म्हणून महिला गटात छत्तीसगडच्या डॉली छत्री (९ गोल) व पुरुष गटात छत्तीसगडच्या जयदीप मरकाम (१० गोल) यांना गौरविण्यात आले.
उल्हास गवळी, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, राष्ट्रीय सचिव टी. सी. शर्मा, राज्य संघटनेचे अध्यक्ष मुनिष शर्मा, उपाध्यक्ष किरण सानप, सचिव प्रसाद कुलकर्णी, डॉ. अजय माने यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण पार पडले. सूत्रसंचालन सुशांत परिहार यांनी केले.