शेतक-यांच्या नावावर राजकारण करावयाचे व जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करावयाची हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी श्रीगोंदे येथे केली.
येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, जि.प.चे अध्यक्ष विठ्ठल लंघे, आमदार शंकरराव गडाख, बिपीन कोल्हे आदी या वेळी उपस्थित होते.
पवार यांनी या वेळी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, कोरडवाहू शेती, अंधश्रद्धाविरोधी विधेयक अशी अनेक कामे राज्य सरकारने केली असून सरकार गतिमान आहे. श्रीगोंदे पालिकेत राष्ट्रवादीचीच सत्ता येईल असा दावा त्यांनी केला. काँग्रेसला येथे सर्व जागांवर उमेदवारही उभे करता आले नाही. पालिकेत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, येथे विकासाची गंगा आणू असे आश्वासन पवार यांनी दिले.  

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?