महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आजपासून ‘कॉपीमुक्त’ बारावी परीक्षेस सुरुवात झाली असली तरी भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्य़ातील परीक्षा केंद्रांवर मातृभाषेच्या पेपरलाच प्रत्यक्षात १३ विद्यार्थ्यांंना कॉपी करताना पकडण्यात आले. कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांंची संख्या जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंडळाने राबविलेल्या ‘कॉपीमुक्ती’साठी नागपुरातील काही परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसला असून या संदर्भात विद्यार्थ्यांंसह शिक्षक संघटना आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली.
सकाळी १० वाजेपासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. गेल्या चार वर्षांंपासून कॉपीमुक्त आणि तणावरहित परीक्षा घेण्याचा संकल्प मंडळाने केला होता तो यावर्षी राबविला व त्यादृष्टीने मंडळाने तयारीही केली होती. गोंदिया जिल्ह्य़ात सर्वात जास्त संवेदनशील केंद्र असल्यामुळे त्या भागातील परीक्षा केंद्रावर
विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. तरी सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्य़ात कॉपीबहाद्दर पकडण्यात
आले. बंदोबस्तानंतरही गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्य़ातील केंद्रावर कॉपीचे प्रकार उघडकीस आले आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूरला २, गडचिरोलीमध्ये ३, गोंदियामध्ये ५, भंडारा २ आणि वध्र्यामध्ये १ विद्यार्थी कॉपी करताना पकडण्यात आले. नागपुरात मात्र एकही ‘कॉपीबाज’ पकडण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले.
 ग्रामीण भागातील बहुतेक परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या एक दिवस आधीच म्हणजेच बुधवारी प्रश्नपत्रिका कस्टोडियनच्या स्वाधीन करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कुठेही अडचणी आल्या नाही. पहिल्या दिवशी फारसे कॉपीचे प्रकार
घडले नाही, असा दावा मंडळाने केला
आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी परीक्षेबाबत जागृती दिसून येत आहे. जिल्ह्य़ातील विविध केंद्रावर आज भरारी पथकांनी भेटी देऊन परीक्षा केंद्राची पाहणी केली. परीक्षेच्या दरम्यान मोबाईलचा वापर करू नये, अशा सूचना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दिल्या असताना अनेक विद्याथ्यार्ंनी मोबाईल आणले होते. मात्र, केंद्रावरील शिक्षकांनी ते ताब्यात घेतले आणि परीक्षा संपल्यानंतर त्यांना परत केले. शिक्षकांनी आणि मुख्याध्यापक संघटनांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा परीक्षेवर कुठेच परिणाम दिसून आला नाही. अनेक केंद्रावर शिक्षकांनी वर्गावर न जाता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परीक्षेच्या कामासाठी लावल्याची माहिती मिळाली. कळमेश्वर आणि काटोलमधील काही शाळांमध्ये टेबलवर विद्याथ्यार्ंचे क्रमांक टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्याथ्य्र्यांनी कुठे बसावे? असा प्रश्न निर्माण झाला होता.