पाणी पिताना तोल जाऊन कालव्यात पडलेल्या अतुल रमेश मुधोळ (वय १२) या मुलाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला.
या मुलाचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर बेलमंडळ येथील गावकऱ्यांनी गुढीपाडव्याचा सण साजरा केला नाही.
कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथील अतुल मुधोळ (वय १२) व देहू अविनाश मुधोळ (वय १६) हे दोघे जण मंगळवारी सायंकाळी शेताकडे जात असताना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी कालव्यात उतरले होते. मात्र, दोघेही पाणी पिताना तोल जाऊन कालव्यात पडले. या घटनेत लोकांनी देहूला वाचविले. अतुल मात्र वाहून गेला.
अतुलचा मृतदेह गुरुवारी सकाळी सापडला. अतुल मुधोळचा पोलीस व ग्रामस्थ मंगळवारी रात्रीपासून शोध घेत होते. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास डोंगरगाव शिवारातील कालव्यात अतुलचा मृतदेह सापडला.