वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी वाटेगावच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संग्रहालय निर्मिती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. मागणीचा पाठपुरावा सांगलीचे पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याकडेही करण्यात येत असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रवींद्र बडेकर यांनी दिली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता. वाळवा) मूळ गाव आहे. तेथे त्यांच्या साहित्याचे संग्रहालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. ती मागणी जुनीच असली, तरी संग्रहालय निर्मिती समितीने त्याचा पाठपुरावा करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. साहित्यप्रेमींची मागणी असल्याने त्याचा सारासार विचार करून लोकांच्या अपेक्षापूर्ती करण्यासाठी साठे यांच्या साहित्याचे संग्रहालय उभे राहण्यासाठी शासनाने सकारात्मक प्रयत्न करावा, असे बडेकर यांनी सांगितले.

Ajit Pawar On Navneet Rana
“नवनीत राणा यांच्या विजयासाठी…”; उपमुख्यमंत्री अजित पवार चुकून काय म्हणाले?
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान