डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, नवापाडा परिसरातील सुभाष क्रॉस रोड, कुशा वस्ता रस्ता, आंबा माता मंदिर परिसराला मलमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. पाण्याला दरुगधी येत असल्याने रहिवाशांनी याबाबतच्या तक्रारी पालिकेच्या ह प्रभागात केल्या आहेत. मलमिश्रित वाहिनी फुटून ती जलवाहिनीली जोडली गेल्यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या भागातील रहिवासी विजय घुले यांनी महापालिकेत यासंबंधी तक्रार अर्ज केला आहे. त्यावर कर्मचाऱ्यांनी येऊन मलनिस्सारण चेंबर्सची सफाई केली. मात्र, घरांमध्ये मलमिश्रित पाणी कोठून जाते याविषयीचा शोध त्यांच्याकडून घेण्यात आलेला नाही, असा रहिवाशांचा आरोप आहे.