दुष्काळी भागातून अन्यत्र स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना शिधापत्रिका व त्यावरील धान्य देण्याबाबत राज्य शासनाकडून स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. दुष्काळी-टंचाईसदृश भागातून कुटुंबीय रोजगारासाठी तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित होत असल्याची माहिती दिली जात आहे. अशा स्थलांतराची शक्यताही आहे. अशा स्थलांतरित कुटुंबीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रेशनकार्ड तसेच रेशनधान्य उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने परिपत्रक प्रसिध्द केले आहे. त्यानुसार कार्यवाही हाती घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी सांगितले.