राज्य सरकारच्या विमुक्त भटक्या जमातीतील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत लातूर तालुक्यातील सिकंदरपूर येथे ४५ घरे साकारणार असून, राज्यात सर्वप्रथम या योजनेचा मान लातूरला मिळाला.
सिकंदरपूर येथे सुमारे ३५ वर्षांपूर्वी कामाच्या शोधात आलेली ४५ भटके कुटुंबे सुमारे १ एकर जागेत पाली घालून राहात होते. तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत या लोकांना पक्की घरे मिळावीत, यासाठी सरपंच माधव गंभीरे, तसेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही पाठपुरावा केला होता. समाजकल्याण विभागाकडे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यातून पक्क्या घरांसाठी तब्बल १ कोटी ७७ लाखांचा निधी मंजूर झाला. २७५ नागरिकांची वस्ती असलेल्या व गवताच्या पालीमध्ये राहणाऱ्या ४५ कुटुंबांना प्रत्येकी २६९ चौरस फुटाची पक्की घरे बांधून मिळणार आहेत. सोबत सेफ्टी टँक, गटारी, पाणी, अंतर्गत रस्ते, अंगणवाडी, शाळा व सभागृहही या योजनेंतर्गत मंजूर केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तांडय़ावरील लोकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
pimpri police commissioner office marathi news, pimpri police commissioner office latest news in marathi
पिंपरी : अखेर पाच वर्षांनी पोलीस आयुक्तालयाला मिळाली हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार आयुक्तालय
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
The State Government has provided funds to the Municipal Corporation for constructing boundary walls along the drains and streams to control the flood situation Pune
ओढ्यांलगत सीमाभिंती बांधण्याचा प्रश्न मार्गी; राज्य सरकारकडून महापालिकेला २०० कोटींचा निधी