सार्वजनिक विंधन विहिरीवर पाणी भरताना विजेचा धक्का लागल्याने सुर्डी येथील १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह चौघे जण जखमी झाले. बुधवारी हा प्रकार घडला. पाणी भरत असताना अंगावर विजेची तार पडल्याने अंजना चतुर्भुज चोले हिचा मृत्यू झाला. रंजना सपकाळ (वय २५), चंद्रकला सपकाळ (वय २०), मनीषा सपकाळ (वय १३) व बाळू सोनवणे (वय १२) हे चौघे जखमी झाले.