घरातली मंडळी कामावर गेल्यानंतर दुपारी पाणी सोडण्यात येत असल्याने बोरिवली-कांदिवली परिसरात सुमारे सव्वा लाख लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करताना नाकीनऊ येत आहेत. पिण्याचे पाणी सोडण्याची ही वेळ गैरसोयीची असल्याने ती बदलून सायंकाळची करण्यात यावी, अशी मागणी करत बोरीवली-कांदिवली परिसरातील नोकरदारांनी त्यासाठी पालिका प्रशासन आणि स्थानिक राजकीय पक्षांवर दबाव आणण्यासाठी सुरुवात केली आहे. खास करून महिलावर्ग त्यासाठी हिरिरीने पुढे सरसावला आहे.
गोराई, चारकोप परिसरातील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना पाण्याच्या या गैरसोयीच्या वेळेचा फटका वर्षांनुवर्षे बसतो आहे. पालिकेतर्फे दुपारी तीन ते सहा या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. या भागातील म्हाडा वसाहतीत जवळपास २५ ते ३० हजार कुटुंब राहतात. म्हणजे साधारणपणे सव्वा ते दीड लाख लोकांना या गैरसोयीचा फटका बसतो आहे. इतक्या लोकांची गैरसोय होत असूनही दुपारच्या वेळेसच पाणी सोडले जात आहे. पाण्याच्या वेळेबाबत रहिवाशांमध्ये असलेला असंतोष आता एकवटत आहे.
या जनमताची दखल घेऊन ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या (मनविसे) पदाधिकाऱ्यांनी आर-सेंट्रल वॉर्डचे पालिका अधिकारी व्ही. जी. बोले यांची नुकतीच भेट घेतली. गोराई-चारकोप या भागात पाण्याची वेळ बदलून सायंकाळी ५ ते ९ किंवा ७ ते १० अशी करण्याची विनंती बोले यांना करण्यात आली.
‘कित्येक कुटुंबांमध्ये पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. पाणी येते तेव्हा दोघेही घरी नसतात. कुटुंब चौकोनी असेल तर घरात पाणी भरून ठेवणारे कुणीच नसते. अशावेळेस पाणी भरण्यासाठी शेजाऱ्यांच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागते. पण, त्यांनी तरी किती काळ हा त्रास सहन करायचा,’ असा सवाल येथील एक रहिवाशी संजना डोके यांनी केला. ‘शेजाऱ्यांचीही दुपारीची वेळ ही वामकुक्षीची असते. त्यांनी आपले पाणी भरून परत आमचेही भरायचे. त्यापेक्षा सायंकाळच्या वेळेस पाणी सोडले तर नोकरदार महिलांची चांगलीच सोय होईल,’ असे मनविसेच्या रेखा पाटील यांनी सुचविले.
‘पाण्याच्या वेळेत बदल करण्याचे अधिकार पालिकेच्या हायड्रॉलिक अभियंत्याच्या हातात आहे. महिलांच्या मागणीचे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचविले जाईल. पण, निर्णय घेणे त्यांच्या अधिकारात आहे,’ असे व्ही. जी. बोले यांनी सांगितले.

Jai Ho’s first look is out, ‘People’s Man’ Salman Khan thanks fans
Salman Khan, Jai Ho, bollywood  
सलमानच्या ‘जय हो’ला प्रसिद्धीचा मुहूर्त सापडला!
प्रतिनिधी, मुंबई
पळा..पळा..कोण पुढे पळे तो.. या बॉलिवूडच्या स्पर्धेत सलमान खान गेले वर्षभर मागे पडला होता. त्यामुळे यावर्षीचा शुभारंभ आपल्याच चित्रपटाने करायचा हे ठरवूनच सलमान आणि सोहेल ‘खान’ बंधू कामाला लागले. मात्र, चित्रिकरण लांबत गेल्यामुळे सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटाला प्रसिध्दीसाठी उसंतच सापडत नव्हती. बॉलिवूडच्या प्रसिध्दी नियमांनुसार चित्रपट प्रदर्शित व्हायच्या किमान एक ते दोन महिने आधी त्याच्या प्रसिध्दी कार्यक्रमांना सुरुवात होते. ‘धूम ३’साठी तर यशराजने चार ते पाच महिने आधीपासून सुरुवात केली होती. मात्र, अखेर सलमानला आपल्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी मुहूर्त सापडला असून कमीतकमी वेळात प्रभावी प्रसिध्दी करण्यासाठी तो अभिनव मार्ग चोखाळणार आहे. सोहेल खान दिग्दर्शित करत असलेल्या ‘जय हो’चे चित्रिकरण काही ना काही कारणांमुळे सतत लांबले गेले. त्यामुळे पोस्ट प्रॉडक्शनचे सोपस्कार पूर्ण करून चित्रपटाच्या प्रसिध्दीचे नियोजन करायला निर्मात्यांकडे वेळच उरलेला नाही. मात्र, गेले वर्षभर चित्रपटांपासून लांब राहिलेल्या सलमानला काहीही करून ‘जय हो’ साठी पध्दतशीर नियोजन आवश्यक आहे. एकतर गेल्या वर्षभरातील त्याची अनुपस्थिती ‘खाना’ वळीतील इतरांना आणि अगदी सलमानच्याच भाषेत सांगायचे तर ‘कल का छोकरा’ असलेल्या रणबीरलाही चांगलीच फळली. त्यात ‘जय हो’मध्ये सलमानबरोबर डेझी शाह आणि सना खान या दोन नवीन अभिनेत्री, तब्बू अशी मोजकीच नावे असली तरी सलमान वगळता यातले कुठलेच नाव ‘हमखास यशस्वी’ शिक्का असलेले नाही. त्यामुळे ‘जय हो’चा संपूर्ण डोलारा सलमानवर असल्या कारणाने ‘दबंग’ खानला यावेळी आपल्या चित्रपटाची पूर्वप्रसिध्दी करावीच लागेल, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.सलमाननेही ते मनावर घेतले असून पुढच्याच आठवडय़ात ‘जय हो’चा ट्रेलर लॉंच करण्यात येणार आहे. मात्र, कमीतकमी वेळात लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवायचा असल्याकारणाने नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद वगैरे न घेता थेट चाहत्यांना आवाहन करण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. जुहू येथील ‘चंदन’ चित्रपटगहात सलमानच्या चाहत्यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मग सलमान ‘भाई’चे चाहते ठरवतीलच पुढच्या वर्षी भाईला ‘जय हो’ करायचे की नाही ते..