महापालिकेच्या पंचवटी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या विद्युत रोहित्राच्या कामामुळे गुरूवारी दुपारी वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यामुळे पंचवटीतील सर्व भागात या दिवशी दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही.
जलशुध्दीकरण केंद्रावर गुरूवारी विद्युत रोहित्र जोडणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे केंद्राचा वीज पुरवठा सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत बंद राहणार आहे. वीज नसल्याने केंद्रात पाणी उचलणे व शुध्दीकरणाचे काम बंद ठेवावे लागणार आहे. त्यामुळे पंचवटीतील सर्व भागात गुरूवारी दुपारी व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. उपरोक्त काम कमी वेळेत पूर्ण झाल्यास कमी प्रमाणात का होईना पण पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे या विभागाने म्हटले आहे.