विद्युत जोडणी घ्यायची असल्यास आता महापालिकेचे ना-हरकरत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
विभागीय आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरात मनपा हद्दीत मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकामे व अतिक्रमणे होत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी विद्युत जोडणी बंधनकारक करणे गरजेचे आहे. रस्ते, खुल्या जागा, रस्त्याच्या काठावरील जागेवर अतिक्रमण, चौकातील जागेवर अवैध बांधकाम व अतिक्रमण होत असल्यामुळे रुग्णवाहिका व अग्निशामक वाहन जागेकरिता अडथळा निर्माण होत आहे. या सर्व प्रकारची शहानिशा न करता परस्पर विद्युत पुरवठा कंपनीकडून होत असल्यामुळे आता विद्युत जोडणी घ्यायची असल्यास मनपाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
यासर्व प्रकरणी चंद्रपूर मनपात बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आले असून यात ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय विद्युत जोडणी देता येणार नाही, मनपा हद्दीतील मोबाईल टॉवर ज्यांना मनपाकडून ना-हरकत प्रमाणपत्र नाही अशांना नोटीस बजावून विद्युत पुरवठा खंडीत करावा व योग्य ती कारवाई करावी, मनपाकडून वाणिज्य प्रयोजनार्थ असलेल्या बांधकामांमध्ये ज्यांनी ना-हरकत प्रमाणपत्र घेतले नाही त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच सार्वजनिक रस्ते, खुल्या जागा व आरक्षणे यांना बाधित करणाऱ्या बांधकामांबाबत विभागीय आयुक्तांकडून उचित कारवाई करण्यात यावी, आदी मुद्यांचा समावेश आहे.

12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Ambulance scam
आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, नियमबाह्य पद्धतीने निविदा दिल्याचा रोहित पवारांचा आरोप
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब