भंडारा जिल्ह्य़ामध्ये तीन सख्या बहिणींवरील बलात्कार व त्यांच्या हत्या करण्याच्या घटनेला  सुमारे १५ दिवसांचा अवधी उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादी पक्षाच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी मोर्चेकरांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवदेन दिले. या हत्येप्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करून या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवावा, अशी मागणी निवेदानात केली आहे.