वाशीच्या एपीएमसी बाजारात भाज्यांचा महापूर आल्याने भाज्या कमालीच्या स्वस्त झाल्या आहेत. मात्र ही स्वस्ताई किरकोळ व्यापारी मधल्यामध्ये खिशात घालून ग्राहकाला मात्र त्याचा लाभ देत नाहीत. वाशी ते मुंबई वाहतूक खर्च आणि वाजवी नफा गृहित धरूनही मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील किरकोळ बाजारांमधील तसेच पदपथावर भाजी विक्री करणारे विक्रेते ग्राहकांची किती लूट करीत आहेत हे लक्षात येऊ शकेल. दुर्दैव म्हणजे ग्राहकाच्या खिशातून जाणारे हे पैसे शेतकऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचत नाहीत. किरकोळ आणि घाऊक व्यापारी व अडते यांच्याच खिशात ही ‘माया’ जाते. एपीएमसीवर कारवाईचा बडगा उगारण्याचा पवित्रा घेणारे सरकार किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई कधी करणार, हा आता प्रश्न आहे. खालील तक्त्यामधील दर उत्तम दर्जाच्या मालाचे आहेत. एपीएमसी बाजारात ‘नंबर-१’ मानकानुसार विकल्या जाणाऱ्या मालाचे हे दर आहेत. किरकोळीची तुलना करताना सरासरी दर देण्यात आले आहेत. अतिशय सुमार दर्जाच्या भाजीचे दर आणखी कमी असू शकतात.भाजीचे नाव घाऊक दर प्रतिकिलो किरकोळ दर प्रतिकिलोकांदा : १३.५० रुपये २२ ते २४ बटाटा : १२ रुपये २२भेंडी : ३० रुपये ५० ते ६० फ्लावर : ३ ते ५ २० ते ४०कोबी : ३ ते ४ २० ते ४० टॉमेटो : ८ ते १० ३० ते ६०काकडी : १८ ३० ते ४० गाजर : १५ ३५ ते ४० दुधी : ४ ते ६ २० ते २५फरसबी : २० ते २६ पडवळ : १० ते १२